राज्यात यंदा मलेरिया-डेंग्यूचे संकट   

मुंबई : महाराष्ट्रात पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढले आहे. यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यात मलेरिया-डेंग्यूचे संकट गडद होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांत डेंग्यू-मलेरियाचे ६० हजारांहून अधिक रुग्ण आढळल्यचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
मुंबईतही यंदा मलेरिया-डेंग्यूसह साथेचे आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढणार असल्याचे पालिकेच्या डॉक्टारांचे म्हणणे आहे. २०२२ मध्ये मलेरियाचे १५ हजार ४५१ रुग्ण आढळले तर २६ जणांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये १६ हजार १५८ मलेरिया रुग्ण आढळले तर १४ जण मरण पावले. २०२४ मध्ये एप्रिलपर्यंत २१ हजार ०७८ रुग्णांची नोंद झाली आणि २६ जणांचा मृत्यू झाला. मुंबई व गडचिरोलीत सर्वधिक मलेरियाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याच काळात डेग्यूच्या रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून आले असून २०२२ मध्ये ८ हजार ५७८ रुग्ण तर २७ जणांचा मृत्यू झाला. 
 

Related Articles